Sericulture Farming

Sericulture Farming : रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याची ‘ही’ पाच कारणे ?

Sericulture Farming : यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal) शेतकऱ्यांनी नवीन पीक पद्धतीची निवड करण्यास सुरूवात केली आहे. त्यात त्यांना यश मिळण्यास प्रारंभ झाला आहे. यातून जिल्ह्यामध्ये रेशीम लागवडीसाठी (reshim Sheti) शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याची बाब पुढे आली आहे. गतवर्षी जिल्ह्यात ६४० एकरांवर रेशीम लागवड झाली. आतापर्यंत ८५० एकरांवर रेशीम लागवड करण्यात आली आहे. यावर्षी ४०० एकरांवर लागवड होण्याची शक्यता आहे.

रेशीम लागवडीसाठी (Sericulture Farm) काही तालुक्यांचाच पुढाकार राहिला आहे. यामध्ये उमरखेड, महागाव, पुसद आणि आर्णी या चार तालुक्यांचा समावेश आहे. इतर तालुक्यातही रेशीम लागवडीचे प्रमाण वाढत आहे. नेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी चार बॅचचे उत्पादन रेशीम कोष विकून घेतले. त्यांना वर्षभरात दोन लाखांचे उत्पादन मिळाले आहे. यासोबतच कमीत कमी एक लाखाचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे.

Sericulture Farming

रेशीम कोष उत्पादन व्यवसाय का ?

  1. शेतीला उत्कृष्ट जोडधंदा.
  2. अल्प कालावधीत हाती येणारे पीक.
  3. एकवेळेस लागवड केल्यानंतर १० ते १५ वर्षे लागवडीची आवश्यकता नाही.
  4. तुती फांद्या व अव्याच्या विष्ठेपासून उत्तम सेंद्रिय खत.
  5. पर्यावरणपूरक व्यवसाय.

बाजारपेठ कुठे ?

रेशीम कोष विकण्यासाठी बडनेरा, जालना, पूर्णा, बीड आणि बारामती या प्रमुख ठिकाणची बाजारपेठ यवतमाळसाठी अतिशय योग्य मानली जाते. या ठिकाणी उत्पादित रेशीम कोष विक्रीसाठी जातो. यावर्षी या रेशीम कोषाला ५०० ते ६०० रूपये किलोचा दर मिळाला आहे.

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता रेशीम शेती करून आर्थिक प्रगती साधावी, यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. रेशीम शेतीतून (Sericulture Farming) शेतकऱ्यांच्या हातात जास्तीचा पैसा पडत असल्याचा अनुभव शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात रेशीम शेतीकडे शेतकरी वळू लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *